Sakshi Sunil Jadhav
दररोजच्या जेवणात भाकरी असतेच, पण अनेकदा भाकरी बनवल्यानंतर काही वेळातच ती कडक होते. त्यामुळे खाण्याचा आनंदच कमी होतो.
फक्त हा १ चमचा घरगुती पिठात घातल्यास भाकरी दिवसभर मऊ राहते. तुम्हाला ही शिळी झाल्यावर खाता येऊ शकते.
भाकरी लगेच कडक होण्याचे मुख्य कारण म्हणजे पिठात ओलावा कमी असणे आणि मळताना पुरेसे पाणी न वापरणे. काही वेळा जास्त भाजल्यामुळेही ती कोरडी होते.
फक्त १ चमचा तेल किंवा दुधाची साय पिठात घातल्याने भाकरी मऊ राहते. हा पदार्थ पिठात ओलावा टिकवतो आणि भाकरी मऊ राहते. 
भाकरीचे पीठ मळताना थंड पाण्याऐवजी कोमट पाणी वापरल्यास पिठाची लवचिकता वाढते आणि भाकरी फुगते तसेच मऊ राहते.
पिठात थोडे मीठ आणि १ टीस्पून तूप घातल्यास भाकरीची चव आणि मऊपणा दोन्ही वाढतात.
मळलेले पीठ १५-२० मिनिटे झाकून ठेवल्यास ते नीट फुलते आणि भाकरी जास्त मऊ होते.
भाकरी भाजताना फास्ट फ्लेमवर न भाजता मध्यम आचेवर भाजल्यास ती मऊ राहते आणि कोरडी होत नाही.
भाकरी भाजून झाली की लगेच झाकण ठेवून ठेवा. त्यामुळे वाफ टिकून राहते आणि भाकरी जास्त वेळ मऊ राहते.