ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात घाम येणं आवश्यक आहे कारण हे शरीराला थंड ठेवण्यासाठी नैसर्गिक आणि महत्त्वाचा प्रक्रिया आहे.
जर जास्त घाम येत असेल, तर त्यातून अस्वस्थता आणि काही आरोग्यसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.
जास्त घाम आल्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची मात्रा लवकर कमी होते, ज्यामुळे शरीर द्रवशून्य होते.
पुरेसे पाणी न प्यायल्यास डिहायड्रेशन होते, ज्यामुळे थकवा, चक्कर, डोकेदुखी आणि कमजोरी निर्माण होऊ शकते.
डिहायड्रेशनमुळे शरीरातील सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या महत्त्वाच्या खनिजांचे प्रमाण कमी होऊ शकते.
जास्त घामामुळे त्वचा ओलसर होते, ज्यामुळे दाद, फोड, मुरुमसारख्या त्वचारोगांना वाढण्याचा धोका वाढतो.
ओलसर भाग बुरशी आणि बॅक्टेरिया वाढण्यासाठी योग्य वातावरण तयार करतात, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
पाणी नियमित प्या, नारळपाणी, लिंबूपाणी आणि ओआरएससारखे इलेक्ट्रोलाइट्स घेत राहा जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील.