Dhanshri Shintre
आंघोळीनंतर नकळत होणाऱ्या काही चुका आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, ज्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वाढते.
आज आपण आंघोळीनंतर होणाऱ्या काही सामान्य पण नुकसानदायक चुकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या त्वचेच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.
आंघोळीनंतर चेहऱ्यावर टॉवेलने जोरात घासल्यास त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतो, त्यामुळे ही सवय टाळणे त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
आंघोळीनंतर रसायनयुक्त मॉइश्चरायझर वापरण्याची सवय काहींना असते, जी त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते आणि विविध त्वचारोग निर्माण होऊ शकतात.
आंघोळीसाठी खूप गरम पाणी वापरल्यास त्वचा कोरडी व निस्तेज होऊ शकते, त्यामुळे नेहमी कोमट पाण्याचा वापर करणे योग्य ठरते.
साबणातील रसायने त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात, त्यामुळे आंघोळीवेळी नैसर्गिक पर्याय म्हणून मुलतानी माती वापरणे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर आहे.
जेवणानंतर त्वरित आंघोळ केल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो, ज्यामुळे पोटदुखी, अॅसिडिटी आणि अपचनासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.