Dhanshri Shintre
भारतामध्ये महाराष्ट्र हे आकारमानानुसार तिसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य असून याचे सामाजिक आणि आर्थिक महत्त्वही खूप आहे.
महाराष्ट्र राज्यात एकूण ६ प्रशासकीय विभाग आणि ३६ जिल्हे असून राज्याची रचना सुयोग्यपणे विभागली गेली आहे.
बाहेरून समृद्ध वाटणाऱ्या महाराष्ट्रातही असा एक जिल्हा आहे, जो आजही दारिद्र्यरेषेखाली जगतो.
कधी तुम्ही विचार केला आहे का, की प्रगत महाराष्ट्रातला सर्वात गरीब आणि मागासलेला जिल्हा नेमका कोणता आहे?
महाराष्ट्रातल्या अनेक नागरिकांना अजूनही याबद्दल माहिती नाही, म्हणूनच हा विषय बराचसा दुर्लक्षित राहिला आहे.
NITI आयोगाच्या 2021 च्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील सुमारे 14.85 टक्के जनता अद्यापही दारिद्र्यरेषेखाली जगत आहे.
महाराष्ट्रातला नंदुरबार जिल्हा हा आर्थिकदृष्ट्या सर्वात मागासलेला आणि गरीब जिल्हा मानला जातो.
नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल ५२.१२ टक्के लोकसंख्या आजही दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असल्याचं समोर आलं आहे.