Dhanshri Shintre
ऑफिसच्या घाईत घरातील महिलांना किंवा पुरुषांना नाश्ता, पाणी आणि कामांमध्ये नाश्त्याकडे दुर्लक्ष होणे ही सामान्य बाब ठरते.
घाईगडबडीत पटकन काहीतरी खाल्ले जाते आणि सर्व आवरून मगच अंघोळ करून घराबाहेर पडले जाते.
दैनंदिन धकाधकीमुळे जीवनशैलीत अनेक अयोग्य सवयी स्थिरावल्या असून आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत.
तज्ज्ञ सांगतात की, नाश्त्यानंतर शरीरातील रक्तप्रवाह प्रामुख्याने पचनक्रियेवर केंद्रित होतो, जे अत्यंत महत्त्वाचे असते.
अशा वेळी अंघोळ केल्यास शरीरातील रक्तप्रवाह विचलित होतो आणि त्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होऊ शकतात.
नाश्त्यानंतर तात्काळ अंघोळ केल्यास पचनक्रियेवर परिणाम होतो आणि अन्नाचे योग्य प्रकारे पचन होण्यात अडथळा निर्माण होतो.
नाश्त्यानंतर लगेच अंघोळ केल्यास शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही आणि त्यामुळे दिवसभर थकवा जाणवत राहतो.
तज्ज्ञांच्या मते, ही सवय आरोग्यास हानिकारक ठरू शकते, त्यामुळे ती त्वरित सोडणं फायदेशीर ठरेल.