ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्याच्या दिवसात आंबा अत्यंत आवडीने खातात.
वर्षातून एकदाच आंबा बाजारात येत असल्याने प्रत्येकजण आंबा खाण्यासाठी खूप वाट पाहतात.
आंब्यापासून अनेक पदार्थ बनवत असतात त्यातील एक पदार्थ म्हणजे आमरस.
मात्र अनेकवेळा घरी केलेला आमरस काही वेळानंतर काळा पडतो. त्यासाठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत.
आमरस करण्यासाठी आंबे कधीही पिकलेले आहेत का तपासावेत.
आमरस बनवताना मिक्सरमध्ये फिरवून घेऊ नका.
तसेच आमरस बनवताना त्यामध्ये दूध मिस्क करु नका,यामुळेच आमरस काळा पडतो.
आमरस घुसळून झाल्यानंतर त्यात आंब्याची कोय घालून ठेवा.
आमरस फ्रिजमध्ये ठेवायचे असल्यास त्यावर काचेचं किंवा मातीचं झाकण ठेवून ते झाकून ठेवा.