Surabhi Jayashree Jagdish
थंडीत लोखंडी कढईचा वापर चांगला असला तरी काही भाज्या यात बनवल्या तर चवीत बदल, धातूची चव किंवा पोषणात घट होऊ शकते. लोखंडी कढई गरम ठेवते, त्यामुळे काही नाजूक भाज्यांचा रंग, चव आणि टेक्स्चर लगेच खराब होऊ शकतो.
टोमॅटो आंबट असल्याने लोखंडी कढईशी लगेच प्रतिक्रिया होते. त्यामुळे भाजी काळसर पडते आणि थोडी धातूसारखी चव येऊ शकते.
चिंच, कोकम यांसारख्या आंबट पदार्थांमुळे लोखंडाचा अंश अन्नात मिसळू शकतो. त्यामुळे रस्सा काळसर आणि जड वाटतो.
दुधी भोपळा सौम्य असल्याने लोखंडी कढईच्या अतिरिक्त उष्णतेने पटकन चिटकतो. यामुळे टेक्स्चर मऊ होऊन पेस्टसारखा होतो. चवीतही फरक पडतो.
मेथी आंबटपणा धरून ठेवत असल्याने लोखंडाशी प्रतिक्रिया होते. त्यामुळे भाजीचा रंग काळा होऊ शकतो. धातूची चवही काही वेळा जाणवते.
वांगी लोखंडाशी लवकर रिएक्शन देतं आणि ती लगेच काळी पडतात. त्याचं टेक्स्चर बिघडतं आणि रंग काळा होतो. चवही कडवट होऊ शकते.
काही भाज्यांमध्ये आयरन आणि ऑक्सलेट्स जास्त असतात, त्यामुळे लोखंडी कढईत शिजवल्यावर काळसरपणा येतो. चव थोडी बिघडू शकते.