ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या स्वयंपाकातील अनेक भाज्यांमध्ये टॉमेटोचा वापर केला जातो.
मात्र काही पदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर टाळला पाहिजे. खासकरून चवीनुसार किंवा काही विशिष्ट पारंपारिक पाककृतींमध्ये.
दुधी भोपळा, पडवळ, दोडका या भाज्यांची स्वतःची एक सौम्य चव असते.
टोमॅटोचा तीव्र आंबटपणा आणि स्वतःची वेगळी चव या भाज्यांची मूळ चव पूर्णपणे बदलून टाकू शकते
काही पालेभाज्यांमध्ये खासकरून मेथी आणि पालकच्या भाजीमध्ये टोमॅटो घातल्यास त्यांचा कडूपणा वाढू शकतो किंवा चव बिघडू शकते.
काही पारंपारिक पद्धतींमध्ये तुरीच्या डाळीच्या वरणात टोमॅटो घालत नाहीत, कारण ते डाळीची मूळ चव बदलण्याची शक्यता असते.
टोमॅटोचा आंबटपणा दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापरल्यास ते पदार्थ शिजवतानाच खराब होऊ शकतात.