Shreya Maskar
काही लोक गोड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात, हे योग्य आहे की अयोग्य जाणून घेऊयात.
तज्ज्ञांचे मत, गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच खूप पाणी पिऊ नये. 30-40 मिनिटांनी पाणी प्यावे. लगेच पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया मंदावू शकते.
गोड खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन टाळण्यास आणि शरीराला साखर बाहेर टाकण्यास मदत करते.
गोड खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने अन्नाचे अडकलेले कण बाहेर पडतात ज्यामुळे दात किडण्याचा धोका कमी होतो.
जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने शरीरातील इन्सुलिन वाढते ज्यामुळे टाईप-२ मधुमेहाचा धोका वाढतो.
नियमित जास्त प्रमाणात साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या समस्या देखील वाढू शकतात.
तसेच अकाली वृद्धत्व येऊ शकते आणि तणाव निर्माण होऊ शकतो. शरीरातील साखरेच्या जास्त प्रमाणामुळे झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.