Shreya Maskar
तुम्हाला वारंवार जुलाब होत असतील तर एका ग्लासात कोमट पाणी, मीठ आणि साखर मिक्स करा आणि प्या. यामुळे शरीरातील डिहायड्रेशनची समस्या दूर होते.
एका पॅनमध्ये पाणी टाका आणि त्यात जिरे उकळून घ्या. पाणी अर्धे झाल्यावर ते थंड करून दिवसातून २- ३ वेळा प्या.
जुलाब होत असतील तर नारळ पाणी पिणे हा रामबाण उपाय आहे.नारळाच्या पाण्यात भरपूर पोटॅशियम असते, जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करते. यामुळे डिहायड्रेशन टळते.
लिंबामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे जुलाबावर फायदेशीर ठरतात. कोथिंबीरीची पाने अपचनाशी संबंधित त्रासावर रामबाण उपाय आहे. त्यामुळे लिंबाच्या पाण्यात कोथिंबीर घालून प्या.
जुलाब होत असतील तर उकडलेला पांढरा भात पोटासाठी अत्यंत सौम्य असतो. यातील स्टार्चयुक्त गुणधर्मामुळे पचनसंस्थेतील अतिरिक्त पाणी शोषून घेण्यास मदत होते.
आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आहे. आल्याचे तुकडे पाण्यात उकळा आणि ते पाणी प्या. यामुळे जुलाब थांबतात.
पावसाळ्यात बाहेरचे जंक फूड, स्ट्रीट फूड खाणे टाळा. तसेच मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाऊ नका. जास्तीत घरी बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.