Alisha Khedekar
चणे पौष्टिक असले तरी मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास कार्बोहायड्रेट वाढू शकतात. त्यामुळे प्रमाणावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
राजमामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर असतात. मात्र जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो.
काळे हरभरे फायदेशीर असले तरी भरपूर प्रमाणात सेवन टाळावे. योग्य प्रमाण आणि संतुलित आहार अधिक महत्त्वाचा आहे.
सोयाबीनमध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात. मात्र गोड किंवा जास्त तेलकट पदार्थांसोबत खाणे टाळल्यास साखर नियंत्रणास मदत होते.
उडीद डाळ पूर्णपणे बंद करण्याची गरज नसते. मात्र डाळीपासून बनवलेले तळलेले पदार्थ नियमित खाणे टाळणे योग्य.
डायबिटीजमध्ये कोणतेही कडधान्य सरसकट बंद करण्याची गरज नसते. प्रमाण, स्वयंपाकाची पद्धत आणि एकूण आहार महत्त्वाचा असतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा