Shreya Maskar
मधुमेहाची समस्या असलेले रुग्ण साखरेला पर्याय म्हणून शुगर फ्री पदार्थांचा आस्वाद घेतात. मात्र जास्त प्रमाणात शुगर फ्री पदार्थ खाणे देखील आरोग्यास घातक ठरते.
शुगर फ्री पदार्थांमध्ये देखील कर्बोदके अन् कॅलरीज असतात. साखरेला पर्याय असलेले पदार्थ (मध, खजूर, गूळ) ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात, ज्यामुळे रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो.
अनेक शुगर फ्री पदार्थांमध्ये सॉर्बिटॉल, मॅनिटॉल किंवा माल्टिटॉलसारख्या शुगर अल्कोहोलचा वापर केला जातो. यांचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने अनेकदा पोट फुगणे, गॅस आणि अतिसार यांसारख्या पचनसंस्थेच्या समस्य उद्भवू शकतात.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, शुगर फ्री पदार्थांवर जास्त अवलंबून राहिल्याने दीर्घकालीन ग्लुकोज चयापचय आणि इन्सुलिन प्रतिसादात अडथळा येऊ शकतो.
शुगर फ्री पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास आतड्यांतील सूक्ष्मजीवांचे संतुलन बिघडू शकते, जे रक्तातील साखरेचे नियमन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
शुगर फ्री पदार्थांचे जास्त सेवन केल्यास तुमचा मेंदू वारंवार गोड खाण्याची इच्छा व्यक्त करतो. ज्यामुळे वजन देखील वाढते. सतत डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होतो.
शुगर फ्री पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास वजन देखील वाढते. कृत्रिम गोडव्यामुळे शरीरातील भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स असंतुलित होतात, ज्यामुळे गोड खाण्याची लालसा वाढते आणि परिणामी वजन वाढू शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.