Sakshi Sunil Jadhav
भारताचे उद्योगपती धीरुभाई अंबानी यांच्या यशोगाथेची सुरुवात अत्यंत साध्या परिस्थितीतून झाली होती.
आज Reliance Industries सारखी बहुराष्ट्रीय कंपनी उभी करणाऱ्या धीरुभाईंचा प्रवास आपण जाणून घेऊयात.
धीरुभाई अंबानी यांचा जन्म गुजरातमधील चोरवाड (Chorwad) या छोट्या गावात एका सामान्य कुटुंबात झाला.
धीरुभाई अंबानी यांचे वडील शिक्षक होते. पण घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती.
धीरुभाई यांनी त्याचमुळे दहावीपर्यंत शिक्षण घेतले आणि पुढील शिक्षण थांबवले.
कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी लहान वयातच छोटे-मोठे काम करायला सुरुवात केली.
वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ते नोकरीसाठी Besse & Company येथे काम करताना व्यवसायातल्या गोष्टी शिकले. त्यातले बारकावे शिकले.
करिअरची सुरुवात त्यांनी पेट्रोल पंप अटेंडंट म्हणून केली आणि पहिल्या पगारात फक्त ३०० रुपये मिळाले. तेव्हा हे पैसे जास्तच होते.
१९५८ साली त्यांनी भारतात परतल्यानंतर रिलायन्स कर्मशिअर कॉर्पोरेशन कंपनी सुरु केली. ती आधी मसाल्यांच्या व्यापाराशी संबंधित होती.
मग त्यांनी १९६२मध्ये धाग्याच्या व्यवसायात उतरुन त्यांनी कंपनीचा विस्तार केला आणि नंतर तीच कंपनी औद्योगिक साम्राज्यात रुपांतरित झाली.