Shruti Vilas Kadam
वारंवार तहान लागणे किंवा तोंड कोरडे वाटणे हे शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे सुरुवातीचे लक्षण आहे.
लघवीचा रंग गडद होणे किंवा लघवी कमी होणे हे शरीरात पुरेसे पाणी नसल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
शरीरातील द्रवपदार्थ कमी झाल्याने रक्ताभिसरणावर परिणाम होतो, त्यामुळे डोकेदुखी किंवा चक्कर येऊ शकते.
पुरेसे पाणी न मिळाल्यास शरीराची ऊर्जा कमी होते आणि सतत थकवा जाणवू शकतो.
त्वचा निस्तेज होणे, ओठ फुटणे किंवा कोरडे पडणे हीही डिहायड्रेशनची सामान्य लक्षणे आहेत.
शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडल्याने स्नायूंमध्ये गोळे येऊ शकतात किंवा वेदना जाणवू शकतात.
डिहायड्रेशनमुळे एकाग्रता कमी होणे, गोंधळल्यासारखे वाटणे आणि निर्णयक्षमता कमी होणे यांसारखे परिणाम दिसू शकतात.