Shruti Vilas Kadam
काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने सकाळी ती खाल्ल्यास शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते.
काकडीमध्ये फायबर मुबलक असते, जे सकाळच्या पचनक्रियेला गती देते व बद्धकोष्ठता कमी करते.
काकडी कमी कॅलरीची असल्याने रिकाम्या पोटी खाल्ल्यास भूक नियंत्रित होते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
काकडीमध्ये डिटॉक्स गुणधर्म आहेत जे शरीरातील घातक द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करतात.
काकडीचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते, ज्यामुळे त्वचेवर ताजेपणा येतो आणि ग्लो वाढतो.
काकडीत पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
सकाळी काकडी खाल्ल्याने पोट शांत राहते आणि शरीरातील सूज (inflammation) कमी होते.