ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महिलांमध्ये मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मासिक पाळीची प्रकिया महिन्यातून एकदा महिलांच्या शरीरात होत असते.
धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभ, सण-उत्सव असल्यास महिला पाळी लांबवण्यासाठी गोळ्या घेतात.
पण या गोळ्याचे वारंवार सेवन केल्यास आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
वारंवार पाळी लांबवण्याच्या गेळीचे सेवन केल्यास डोकेदुखीची समस्या होऊ शकते.
पाळी लांबवण्याची गेळी खाल्यास थकवा येणे, चिडचिड होणे या सारख्या समस्या देखील होतात.
पाळी लांबवण्याची गोळी जास्त प्रमाणात खाल्यास मासिक पाळी बंद होण्याचा धोका निर्माण होतो.
नैसर्गिकरीत्या सुरू असलेले पाळीचे चक्र पुढे-मागे केल्यास शरीरात अनेक वाईट परिणाम दिसून येतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.