Sakshi Sunil Jadhav
सणसुदीच्या दिवसांत सुकं खोबरं, रवा, मैदा या वाण सामानांचे दर वाढत असतात.
तसेच सध्या पुण्याच्या बाजारपेठांमध्ये खोबऱ्याचे दर वाढले आहेत.
पुणे बाजारात खोबऱ्याचे दर किलोमागे तब्बल १०० रुपयांनी वाढले आहेत.
तसेच किरकोळ बाजारात दर ४२० रुपये किलोवर पोहोचले आहेत.
फक्त पुण्यातच नाही तर, तमिळनाडू आणि कर्नाटकातही दर वाढलेले आहेत.
तमिळनाडू आणि कर्नाटकातील नारळाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाल्याने ही दरवाढ झाली आहे.
रोजची मागणी २० ते ३० टन असतानाही केवळ १५ ते २० टन खोबरे बाजारात येत आहे.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मागणी आणखी वाढणार असून दरात अधिक वाढ होण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
नारळ आणि नगामागेही पाच ते सात रुपयांची वाढ नोंदवली जात आहे.
NEXT : श्रावणाआधी दीप पूजन का करतात? पारंपरिक पद्धतीसह संपूर्ण माहिती