ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यातील नागरिकांना भयानक गरमीचा सामना करावा लागतो.
तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसही पडत आहे.
अशा बदलत्या वातावरणाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
कोणाला सर्दी तर कोणाला खोकला आणि तापाच्या रुग्णांतही वाढ होत आहे.
बदलत्या वातावरणात प्रत्येकाने उकळून पाणी प्यावे.
प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात साधारण ३ ते २ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे.
दिवसभरातल्या आहारात तेलकट पदार्थ वर्ज करुन सरबत ,ताक तसेच शहाळे यांचा समावेश करावा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.