Shreya Maskar
वीकेंडला मुंबईजवळ वन डे पिकनिक प्लान करत असाल तर पालघरमधील चिंचणी बीच बेस्ट ऑप्शन आहे. जेथे तुम्ही एक निवांत दिवस घालवू शकता.
चिंचणी बीच हा पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात, तारापूरजवळ, बोईसर-डहाणू रोडवर वसलेला एक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे.
चिंचणी बीच हा शांत आणि निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखला जातो. जिथे सोनेरी वाळू आणि शांत समुद्र किनारा पाहायला मिळतो.
चिंचणी समुद्रकिनाऱ्याजवळ खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. येथे स्नॅक्सची दुकाने पाहायला मिळतात.
चिंचणी बीचवरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करू शकता.
चिंचणी बीचला गेल्यावर घोडेस्वारी, उंटस्वारी, बोटिंग करता येते. येथे तुम्ही कुटुंब, मित्र आणि जोडीदारासोबत जाऊ शकता.
चिंचणी बीचला जाण्यासाठी वाणगाव स्टेशनला उतरा. तेथून तुम्ही रिक्षाने चिंचणी बीचला जाऊ शकता. येथे तुम्हाला निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळेल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.