ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखले जातात.
शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पहाटे मंत्रोच्चाराच्या संस्काराने सुरु झाला.
शिवरायांनी सर्वात आधी कुलदैवतेचे स्मरण केले.
राज्याभिषेक सोहळ्यासाठी त्यांनी पांढरे वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातल्या होत्या.
या सोहळ्यात दोन प्रमुख विधी होते. त्यातील एक म्हणजे राजांचा अभिषेक आणि राज्यांच्या डोक्यावर छत्र धरणं.
महाराजांच्या अभिषेकासाठी आठ नद्यांमधून पाणी आणले होते. अष्टप्रधानातील आठ प्रधानांनी हे जलकुंभात पाणी आणले होते.
याच जलकुंभातून शिवाजी महाराजांवर अभिषेक करण्यात आला होता. यावेळी वेगवेगळे सूरवाद्य वाजवत होते.