ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छत्रपती संभाजी महाराजांची समाधी पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक-तुळापूर याठिकाणी आहे.
औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्यांचा छळ करून त्यांची हत्या केली.
संभाजी राजांनी धर्मांतराला नकार दिला. यापेक्षा त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिलं.
ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी शिवप्रेमींनी तसंच सामाजिक संघटनांनी स्वच्छता, नूतनीकरण यांचं काम केलं आहे.
संभाजी राजांच्या समाधी स्थळाचा हा दुर्मिळ फोटो आहे.
१५० वर्षांपूर्वी समाधी स्थळ सध्याच्या तुलनेत अधिक साधं आणि नैसर्गिक स्वरूपात असल्याचं आपल्याला दिसून येतं.
वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी संशोधनाद्वारे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी जगासमोर आणली.