Saam Metype
आचार्य चाणक्य यांनी स्त्रियांच्या अशा काही गुणांबद्दल सांगितले आहे ज्यामध्ये पुरुष त्यांना कधीही मागे टाकू शकत नाहीत.
नीतिशास्त्रामध्ये चाणक्याने जीवनाच्या प्रत्येक पैलूंशी संबंधित बाबींवर आपले मत व्यक्त केले आहे.
स्त्रीणां द्विगुण आहारो बुद्धिस्तासां चतुर्गुणा। साहसं षड्गुणं चैव कामोSष्टगुण उच्यते।। या ओळींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे.
चाणक्य मानतात की स्त्रियांचा आहार पुरुषांपेक्षा जास्त असतो. त्यामागील कारण म्हणजे महिलांची शरीर रचना अशी असते की त्यांना जास्त अन्न लागते.
महिलांमध्ये पुरुषांपेक्षा चौपट अधिक बुद्धिमत्ता असते. यामुळेच स्त्रिया आयुष्यात येणाऱ्या समस्या चांगल्या पद्धतीने हाताळतात.
जरी पुरुष स्वतःला धैर्यवान मानत असले तरी चाणक्य मानतात की स्त्रिया पुरुषांपेक्षा सहापट अधिक धैर्यवान आहेत. मात्र, वेळ आल्यावरच महिला आपले धाडस दाखवतात.
आचार्य चाणक्य मानतात की पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये लैंगिकता जास्त असते. वरील श्लोकानुसार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये आठपट जास्त लैंगिकता दिसून येते.