Manasvi Choudhary
रात्री भात खाल्ल्याने वजन वाढते असा अनेकांचा समज आहे. यासाठी अनेकजण रात्रीचे जेवण स्किप करतात. रात्री हलके फुलकं जेवण करतात.
मात्र यामागचे नेमकं कारण काय? खरंच रात्री भात खाल्ल्याने वजन वाढते का? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
शरीराला गरजेपेक्षा जास्त कॅलरीज मिळणे हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे. कॅलरीज नियंत्रणात असतील, तर तुम्ही रात्री भात खाल्ला तरी तुमचे वजन अजिबात वाढणार नाही.
पांढरा भात हा कार्बोहायड्रेट्स असेत जे पचायला सोपे जाते. मात्र रात्रीच्या वेळी पचनसंस्था मंदावते अशावेळी तुम्ही इतर पदार्थ खाण्यापेक्षा डाळ-भात खाणे अधिक फायदेशीर ठरते.
भातातील कर्बोदकांमुळे शरीरात 'सेरोटोनिन' आणि 'ट्रिप्टोफॅन' नावाचे हार्मोन्स तयार होतात, जे मानसिक ताण कमी करून रात्री शांत झोप लागण्यास मदत होते.
भात मऊ असतो जेवणाची चव वाढवतो यामुळे आपण अधिक खातो त्यामुळे कॅलरीज वाढतात आणि वजन वाढू शकते.
अनेक जण रात्री उशिरा जेवतात आणि लगेच झोपतात. यामुळे शारीरिक हालचाल न झाल्याने त्या कर्बोदकांचे चरबीत रूपांतर होते ज्यामुळे वजन वाढते. तसेच पांढऱ्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि नंतर लगेच भूक लागते.