Manasvi Choudhary
डायबिटीज हा आजार सध्या वेगाने वाढत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम आरोग्यावर होतो आहे.
रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास डायबिटीजचा धोका संभवतो. डायबिटीजच्या रूग्णांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. काही पदार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवू शकतात यामुळे डायबिटीजच्या रूग्णांनी योग्य पदार्थाचे सेवन करणे महत्वाचे आहे.
डायबिटीजचे रूग्ण बटाटा खाऊ शकतात की नाही? असा अनेकांचा संभ्रम आहे. बटाटा खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते का? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
कोणताही पदार्थ रक्तातील साखर किती वेगाने वाढवतो हे त्याच्या ग्लायसेमिक इंडेक्स वरआधारित असते. ज्या पदार्थाचा (GI) जास्त असतो तो पदार्थ वेगाने रक्तातील साखर वाढवतो.
बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्याने रक्तातील साखर वाढू शकते.
बटाट्याऐवजी तुम्ही रताळे खाऊ शकता. रताळे चवीला गोड असले तरी त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स बटाट्यापेक्षा कमी असतो. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी असते जे इन्सुलिनची क्षमता वाढवतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.