Shreya Maskar
आर्द्रता आणि हवामानातील चढ-उतार इन्सुलिन आणि रक्तदाबावर परिणाम करू शकतात. अचानक होणारी वाढ किंवा घट ओळखण्यासाठी तुमचा ग्लुकोज आणि रक्तदाब सातत्याने तपासा. औषधे वेळेवर घ्या.
रस्त्यावरील खाद्यपदार्थ, कच्चे सॅलड आणि आधीच कापलेली फळे खाणे टाळा, ज्यात जिवाणूंच्या संसर्गाचा उच्च धोका असतो. पावसाळ्यात गरम, ताजे शिजवलेले जेवण खा.
जास्त मीठ आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करा, ज्यामुळे शरीरात पाणी साठते आणि रक्तदाब वाढतो. ग्लुकोजची पातळी अचानक वाढू नये म्हणून जास्त साखर असलेले पदार्थ आणि गोड पेये टाळा.
जेव्हा हवामान थंड आणि दमट असते, तेव्हा आपण पाणी पिणे विसरतो किंवा टाळाटाळ करतो. रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि रक्तातील साखरेचे चढउतार टाळण्यासाठी शरीरात पुरेसे पाणी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पावसाळ्यात घाण पाण्यामुळे पायांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो. मधुमेहींनी बाहेर अनवाणी चालणे टाळावे, नेहमी वॉटरप्रूफ चप्पल घाला. बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी आपले पाय स्वच्छ व कोरडे ठेवा.
पावसाळी हवामानामुळे घराबाहेरील व्यायामात अडथळा येऊ शकतो, परंतु रक्तातील साखर आणि वजन नियंत्रणासाठी नियमित शारीरिक हालचाल आवश्यक आहे. जलद चालणे, योगा किंवा स्ट्रेचिंग यांसारख्या घरातील व्यायाम आवर्जून करा.
पावसाळ्यात विषाणूजन्य, जिवाणूजन्य आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ होते. मधुमेहींना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.