Shruti Vilas Kadam
पावसाळ्यात दिवसभर पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते.
१ ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये १ चमचा बडिशेप अर्धा चमचा धने आणि पाव चमचा जिरे घाला. हे पदार्थ शरीरातला वात कमी करून पचन चांगलं होण्यासाठी मदत करतात.
घाईघाईने जेवल्याने पोटात हवा जाण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक घास व्यवस्थित चावून सावकाश जेवणे फायदेशीर ठरते.
पावसाळ्यात तळलेले, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते. मात्र अशा पदार्थांमुळे पचनास त्रास होऊन पोट फुगणे किंवा जडपणा जाणवू शकतो.
दही किंवा इतर प्रोबायोटिक पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ल्याने आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन राखण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे पचनक्रियेसाठी हे पदार्थ उपयोगी ठरू शकतात.
पावसामुळे घराबाहेर जाणे शक्य नसले तरी घरच्या घरी चालणे, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम करता येतो. शारीरिक हालचालींमुळे आतड्यांची हालचाल सक्रिय राहण्यास मदत होते.
अनियमित वेळेत जेवणे, खूप उशिरा जेवणे किंवा सतत स्नॅक्स खाणे टाळा. नियमित दिनचर्या आणि पुरेशी झोप पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे.