Priya More
पाणी हे जीवन आहे असं म्हटलं जातं. जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
शरीराला पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे सतत पाणी प्यावे. त्यामुळे शरीर चांगले राहते.
पाणी प्या असे जरी सांगितले जात असले तरी देखील पाणी पिण्याच्या योग्य वेळा आहेत.
सकाळी उठल्यानंतर ३ ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
अंघोळ केल्यानंतर १ ग्लास पाणी प्यावे. यामुळे ब्लड प्रेशर कमी होतो.
जेवणाच्या ३० मिनिटांपूर्वी २ ग्लास पाणी प्यावे. यामुळे अन्नपचन योग्य पद्धतीने होते.
जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायले तर त्यामुळे शरीराला नुकसान होऊ शकते.
जेवण करताना सतत पाणी प्यायल्यामुळे त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो.
झोपण्यापूर्वी अर्धा ग्लास पाणी प्या. यामुळे हार्ट अटॅक येणार नाही.