ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर कोल्हापुरात आलात तर अंबाबाई देवीच्या दर्शनाला नक्की जावा. अंबाबाई मंदिराला दक्षिण काशी असेही म्हटले जाते.
कोल्हापुर शहरापासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. दररोज अनेक पर्यटक येथे येत असतात.
कोल्हापुरात गेल्यानंतर नक्की रंकाळा तलाव पाहायल जावा. देशभरातून आलेले पर्यटक कोल्हापुरात आल्यावर येथे आवर्जून जात असतात.
छत्रपती शाहू महाराज यांचे निवासस्थान म्हणून न्यू पॅलेसला ओळखले जाते. या म्सुझियममध्ये तुम्हाला अनेक दुर्मिळ वस्तु पाहायला मिळतील.
साधारण कोल्हापुरपासून वीस किलोमीटर अंतरावर किल्ले पन्हाळगड आहे. दरवर्षी अनेक पर्यटक येथे जात असतात.
कोल्हापुर शहरापासून ९० किलोमीटर अंतरावर विशाळगड आहे. अनेक निसर्गप्रेमीचे हे आवडते ठिकाण आहे.
कोल्हापुरात आलेले पर्यटक आवर्जून राधानगरी धरण पाहायला जातात. राजर्षी शाहू महाराजांनी साधारण १०० वर्षापूर्वी हे धरण बांधले होते.
कणेरी मठास सिद्धगिरी मठ म्हणूनही ओळखले जाते. या मठात ग्रामजीवन अतिशय सुंदर पद्धतीने उभारले आहे.