ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नागवेलीची पाने खाल्यास शरीराला अनेक फायदे होतात. अनेक जण जेवल्यानंतर नागवेलीच्या पानांचे सेवन करतात त्यामुळे त्यांच्या तोंडाची चव वाढते.
नागवेलीच्या पानांचे सेवन केल्यास तोंडामधून दुर्गंध येत नाही. पण नागवेलीच्या पानांचे सेवन केल्या आरोग्यालाच नाही तर सैंदर्यासाठी देखील फायदेशीर आहे.
नागवेलीच्या पानांमध्ये अँटिबॅक्टिरियल गुणधर्म आढळतात ज्यामुळे पिंपल्सच्या समस्या दूर होतात.
जेवणानंतर नागवेलीची पान खाल्यास आतड्या निरोगी रहाण्यास मदत होते.
नागवेलीची पाने शरीरात उष्ण असतात यामुळे वात आणि कफ सारखे विकार होत नाही.
तुम्हाला डोकेदुखीची समस्या असल्यास नागवेलीच्या पानांचे सेवन करा.
नागवेलीच्या पानांचे सेवन देटा सोबत केल्यास पोट साफ होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.