Saam Tv
साखरेच्या तुलनेत गुळावर कमी प्रक्रिया केली जाते. त्यामुळे त्यात खनिज, लोह भरपूर प्रमाणात टिकून असतात.
गुळामध्ये लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ज्यांच्या रक्तात लोहाची कमी आहे. त्यांच्यासाठी गूळ हा फायदेशीर आहे.
जेवणानंतर गूळ खाण्याची परंपरा आहे. गुळामध्ये पचनास उपयुक्त गुणधर्म असल्याने पचनक्रिया सुधारते.
गुळामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि नैसर्गिक गोडवा असल्याने शरीराला पटकन ऊर्जा मिळते.
जास्त साखर खाल्ली तर वजन वेगाने वाढते. पण गूळ खाल्ला तर वजन कमी करण्यास मदत होते.
गुळामध्ये अँटिआँक्सिडंट आणि खनिजे असल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.