ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात आपल्या आरोग्यासोबत केसांची देखील भरपूर काळजी घ्यावी लागते.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे केस गळती, केसांमध्ये कोंडा होणे यासारख्या समस्या होण्याची शक्यता असते.
बाजारातील महागड्या तेलामध्ये अनेक रसायनांचा वापर केला जातो.
मात्र घरी जास्वंदीचे आयुर्वेदिक तेल बनवून केसांना लावल्यास केस गळतीची समस्या होईल दूर.
जास्वंदाच्या फुलामध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात ज्यामुळे केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
जास्वंदाच्या फुलात अमिनो अॅसिड्स असतात ज्यामुळे केसांना पोषण मिळण्यास मदत होते.
जास्वंदाच्या तेलाचा मसाज केल्यामुळे तुमच्या केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.