Shruti Vilas Kadam
संध्याकाळी लवकर जेवल्याने अन्न पचण्यासाठी शरीराला पुरेसा वेळ मिळू शकतो. त्यामुळे अपचन, अॅसिडिटी आणि पोट फुगण्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते.
रात्री उशिरा जेवण्याऐवजी ७ वाजता जेवल्यास शरीरातील अतिरिक्त कॅलरी कमी साठण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाऊ शकते.
उशिरा जेवल्यामुळे अनेकदा झोपेवर परिणाम होऊ शकतो. लवकर जेवण केल्यास शरीर हलके वाटते आणि शांत झोप लागण्यास मदत मिळू शकते.
जेवण आणि झोप यामध्ये अंतर ठेवल्यास अॅसिडिटी आणि जळजळीचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
लवकर जेवल्यानंतर थोडं चालणं किंवा हलकी हालचाल करण्यासाठी वेळ मिळतो. यामुळे शरीर अधिक सक्रिय राहण्यास मदत होऊ शकते.
काही अभ्यासांनुसार, लवकर जेवण केल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते.
उशिरा आणि जड जेवण केल्यास शरीराला अस्वस्थ वाटू शकते. संध्याकाळी ७ वाजता हलके आणि संतुलित जेवण केल्यास शरीर फ्रेश वाटू शकते.