ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बीड जिल्हा हा ऐतिहासिक वारसा असलेला जिल्हा आहे. या शहराचे प्राचीन नाव चंपावती नगरी होते.
जर तुम्ही ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बीड जिल्ह्यात फिरण्यासाठी जात असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.
कंकालेश्वर मंदिर हे भगवान शंकराचे मंदिर आहे. हे मंदिर तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेले आहे.
सौताडा हे स्थळ पाटोदा तालुक्यात असून पावसाळ्यात तुम्हाला या सुंदर धबधब्याच अलौकिक दृश्य पाहायला मिळेल.
हे नायगाव अभयारण्य भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांसाठी प्रसिद्ध आहे.
येथे हिंदू पुराणांतील गोष्टींचे वर्णन करणाऱ्या व शिव, नंदी, गणेश व इतर देवांच्या आणि देवींच्या कलाकृती आहेत.
बीड जिल्ह्यातील धारूर हे महत्वाचे शहर आहे. धारूर गावातून किल्ल्यापर्यंत गाडीने आपण थेट जाऊ शकतो.