Saam Tv
सकाळी आणि संध्याकाळी दिवसातून दोन वेळा ब्रश करा. किमान 2 मिनिटे फ्लोराईडयुक्त टुथपेस्टने ब्रश करा.
कांदा आणि लसूण यामध्ये दुर्गंधी वाढवणाऱ्या किटाणूंचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्यावर लगेच तोंड स्वच्छ करा.
कॉफी, कॅफिनयुक्त पदार्थ किंवा मद्यपानामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे तोंड कोरडे पडते आणि तोंडाला वास येतो. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन कमी करा.
दात घासताना आपण बहुतेकदा जीभ घासतच नाही. जीभेत बॅक्टेरिया साचल्याने दुर्गंधी येऊ शकते. त्यामुळे टंग क्लिनरने जीभ स्वच्छ करा.
तोंड कोरडे झाल्यामुळे तोंडाचा वास वाढतो. त्यामुळे पुरेसे पाणी पिण्याची सवय ठेवा.
सफरचंद, गाजर किंवा काकडीसारखे पदार्थ खाल्ल्याने तोंडातील लाळेचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तोंडाचा वास येत नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.