ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काही मुले कालांतराने आळशी होतात. कोणतेही काम मनापासून करत नाहीत. प्रत्येक कामे टाळू लागतात. हे केवळ खूप प्रेम आणि काळजीमुळे होत नाही, तर त्यामागे इतरही कारणे असू शकतात.
पालक अनेकदा अनेक चुका करतात, ज्यामुळे त्यांची मुले निष्क्रिय होतात. या चुकीमुळे मुले हट्टी होतात आणि नंतर पालकांचे ऐकत नाहीत.
अनेक वेळा मुले त्यांच्या पालकांचे शब्द एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. मुले स्वतःहून कोणतेही काम करू इच्छित नाहीत आणि हळूहळू जबाबदारीपासून पळ काढू लागतात.
पालकांनी मुलांना काही काम दिले तर मुले त्यांचे ऐकून काम करतात. पण तरीही पालक त्या कामाचे कौतुक करण्याऐवजी त्यात उणिवा दाखवतात. या मुलांच्या मनावर मोठा परिणाम होतो.
जे पालक आपल्या मुलांवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मुले हळूहळू कामचुकार होतात.
जेव्हा पालक लहान-लहान गोष्टींसाठी मुलांवर हात उगारतात तेव्हा मुले अनेकदा दूर राहण्याचा प्रयत्न करतात. कारण मार खाण्याच्या सवयीमुळे ते मुले निगरगट्ट होतात. आई-वडिलांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत.
पालक मुलांची जास्त चौकशी करत राहिले तर मुलं पालकांवर विश्वास ठेवत नाहीत. दिलेली काम न करण्यात ते अधिक धन्यता मानतात.
मुलांची जास्त चौकशी केल्याने मुले पालकांपासून अंतर राखू लागतात. पालकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागतात. यामुळे ते कामचुकार होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.