ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तुशास्त्रानुसार आपण घरात अशा अनेक गोष्टी आणतो. ज्याचा आपल्या घरावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडत असतो.
त्यात आपण घरामध्ये मनी प्लांट लावतो जेणे करुन घरात धन, सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
मात्र मनी प्लांट घरात लावताना वास्तूशास्त्राचे हे नियम पाळणे गरजेचे आहे.
मनी प्लांटची वेल पिवळी पडली किंवा सुकल्यास ती लगेच काढून टाकावी. अन्यथा आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते.
वास्तुशास्त्रानुसार ही वेल जमिनीला स्पर्श करणे अशुभ मानले जाते. याचा परिणाम सुख-समृद्धीवर होतो.
आपल्या घरातील मनी प्लांट हा कोणत्याही व्यक्तीला देऊ नये. त्यामुळे घरातील आर्थिक भरभराटी थांबते.
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला लावावा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.