Tanvi Pol
मासिक पाळी दरम्यान महिलांनी फळांचा आहारात जास्त प्रमाणात करावा हे सांगण्यात येते.
मात्र मासिक पाळी दरम्यान असे काही फळं आहेत जी खाल्ल्याने महिलांना तो त्रास वाढू शकतो.
पपई उष्ण प्रकृतीचं फळ आहे. हे खाल्ल्याने गर्भाशयाच्या स्नायूंवर परिणाम करून जास्त रक्तस्राव वाढवू शकते.
मासिक पाळीमध्ये काही जणींनी केळी खाल्ल्यास पचायला कठीण जातं. केळी खाल्ल्यामुळे काहींना पोट फुगण्याचा त्रास वाढवू शकतो.
जास्त प्रमाणात आंबट फळं खाल्ल्यास पोटात आम्लता वाढू शकते आणि गॅसेसचा त्रास होऊ शकतो.
किवी हे फळ उष्ण आणि आम्लीय असल्याने काहींना जास्त रक्तस्राव किंवा पोट बिघडण्याची शक्यता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: पावसाळ्यात चिमुकल्यांचा व्हायरल इन्फेक्शनपासून कसा बचाव कराल?