ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
पावसाळ्यात काही पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. यासाठी पावसाळ्यात कोणते पदार्थ खावे आणि कोणते खाऊ नये, जाणून घ्या.
पावसाळ्यात लोकांना अनेकदा बाहेरचे खाण्याची इच्छा होते. परंतु पावसाळ्यात काही अन्नपदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
पावसाळ्यात तळलेले पदार्थ खाल्ल्याने पोटाचे विकार होऊ शकतात. यामुळे तळलेले पदार्थ खाणं टाळा.
पावसाळ्यात सागरी जीव, जसे की, मासे खाणं टाळा. पावसाळ्यात यांमध्ये बॅक्टेरिया आणि विषाणूची संख्या वाढते. ज्यामुळे विषबाधा होऊ शकते.
पावसाळ्यात दुग्धजन्य पदार्थ लवकर खराब होतात. त्यामुळे त्यांचे सेवन केल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते.
पावसाळ्यात कापून उघड्यावर ठेवलेली फळे खाणं टाळा. हे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं.