Shreya Maskar
वेताळगड किल्ल्याला वेताळवाडी किंवा वेताळवाडीगड असेही म्हणतात. वेताळवाडी किल्ला छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात सोयगाव तालुक्यात अजिंठा-सातमाळा रांगेत वसलेला डोंगरावरील किल्ला आहे.
वेताळगड किल्ला एकेकाळी एक मोक्याची टेहळणी चौकी आणि संरक्षणात्मक तळ म्हणून वापरला जात असे. आपल्या प्रभावी तटबंदीमुळे आणि तिथून दिसणाऱ्या विहंगम दृश्यांमुळे तो ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींना नेहमीच आकर्षित करतो.
वेताळगड किल्ला त्याच्या २५ फूट उंचीच्या, सुस्थितीत असलेल्या भव्य बेसाल्ट (काळ्या पाषाणाच्या) तटबंदीसाठी आणि २४ बुरुजांसाठी प्रसिद्ध आहे.
किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे १९०० फूट (५७९ मीटर) आहे. किल्ल्यावरून हळदा घाट आणि वेताळवाडी धरणाची सुंदर दृश्य पाहायला मिळतात.
वेताळवाडी किल्ला किमान १२ व्या ते १४ व्या शतकातील (चालुक्य किंवा यादव काळ) असल्याचे मानले जाते.
मुंबईहून छत्रपती संभाजीनगरपर्यंत ट्रेनने प्रवास करा. स्टेशनपासून वेताळवाडी गावापर्यंत एसटी किंवा रिक्षाने प्रवास करा. किल्ल्याचा ट्रेक वेताळवाडी या पायथ्याच्या गावापासून सुरू होतो.
हा किल्ला प्राचीन व्यापारी मार्ग आणि जवळच असलेल्या 'हाल्डा घाटा'वर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता. वेताळवाडी किल्ला २५.५५ एकर क्षेत्रावर पसरलेला आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.