Shreya Maskar
महाराष्ट्रभर वारीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे.
विठ्ठल भक्त विठ्ठलाच्या सेवेत तल्लीन झाले आहेत.
आषाढी एकादशीला विठ्ठलाला तुळशीहाराने सजवले जाते.
वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात.
विठ्ठलाला तुळशीहार का वाहतात ? याचे कारण आज आपण जाणून घेऊया.
भारतीय संस्कृतीत तुळशीला धार्मिक, आरोग्यदृष्ट्या तसेच वैज्ञानिकदृष्ट्या ही खूप महत्त्व आहे.
तुळस ही लक्ष्मीचे प्रतीक आहे. तर विठ्ठल हे विष्णूचे स्वरूप आहे.
लक्ष्मी ही विष्णूची अर्धांगिनी असल्यामुळे विठ्ठलाला तुळशीहार वाहतात.
तुळशी माळेमध्ये श्री विष्णूची स्पंदने असल्यामुळे विठ्ठलाला हार घालतल्यास विठ्ठल मूर्ती जागृत होते, असे म्हणतात.
तुळशीमध्ये देवी लक्ष्मी आणि विष्णूचा वास असतो.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही