Ankush Dhavre
पालक आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करतात. शाळेत गेल्यापासून ते घरी येईपर्यंत ते आपल्या मुलांची वाट पाहत असतात.
पालकांना आपल्या मुलांची आवड निवड चांगल्या पद्धतीने माहित असते.
मात्र आपला मुलगा घरी आल्यानंतर तुम्ही त्यांना काही प्रश्न आवर्जुन विचारायला हवेत.
शाळेतून आल्यानंतर तुम्ही त्यांना जेवणाच्या डब्याबाबत प्रश्न विचारा. हे प्रश्न विचारून तुम्ही त्यांची आवड निवड समजून घेऊ शकता.
मुलांची मित्र असतात. तुम्ही त्यांच्या मित्रांबद्दल विचारपूस करणं गरजेचं आहे. जेणेकरुन त्यांचे मित्र कसे आहेत, हे तुम्हाला कळेल.
शाळेत काय काय झालं, काय नवीन शिकायला मिळालं हे विचारणं खूप गरजेचं आहे.
खेळण्याच्या गडबडीत अभ्यास राहुन जातो. मात्र पालक म्हणून तुम्ही त्यांच्या अभ्यासाबाबत प्रश्व विचारणं गरजेचं आहे.
त्यांच्याकडून अभ्यास करुन घ्या.
या सवयींमुळे नक्कीच तुमच्या मुलांमध्ये सकारात्मक सुधारणा होईल.