Surabhi Jayashree Jagdish
अनेक महिलांच्या भुवयांचा रंग फिकट दिसायला लागला की, चेहऱ्याचा एकूण लूक थकलेला आणि वेगळा वाटू लागतो. वाढतं वय, जास्त केमिकल प्रॉडक्ट्स, पोषणाची कमतरता किंवा चुकीची काळजी यामुळे भुवया विरळ आणि रंग फिकट होऊ शकतो.
मात्र काही सोप्या आणि घरच्या उपायांनी भुवयांना पुन्हा नैसर्गिक ठळकपणा देता येतो. नियमित काळजी घेतली तर मेकअपशिवायही भुवया सुंदर दिसू शकतात.
रात्री झोपण्यापूर्वी भुवयांवर एरंडेल तेल हलक्या हाताने लावा. हे तेल केसांच्या मुळांना पोषण देतं आणि रंग गडद होण्यास मदत करतं. आठवडाभरातच फरक जाणवायला लागतो.
कढीपत्त्याची पेस्ट करून ती खोबरेल तेलात मिसळा. ही पेस्ट आठवड्यातून २ वेळा भुवयांवर लावा. नैसर्गिक पद्धतीने भुवयांचा रंग गडद दिसू लागतो.
बदाम तेलात व्हिटॅमिन E भरपूर प्रमाणात असतं. दररोज २ मिनिटं भुवयांची हलकी मालिश करा. भुवया जाड आणि ठळक दिसण्यास मदत होते.
ताजं अॅलोवेरा जेल थेट भुवयांवर लावा. यामुळे केसांची वाढ सुधारतं आणि रंग फिकट होणं कमी होतं.
भुवया वारंवार साबणाने धुणं टाळावं. जास्त घासल्याने केस कमकुवत होऊन रंग फिकट होतो.हलक्या हातानेच चेहरा स्वच्छ करा.
भुवयांवर जास्त केमिकल्स असलेले प्रोडक्ट्स वापरू नका. हार्श क्रीम्सच्या वापरामुळे रंग आणखी फिकट होतो. अशावेळी नैसर्गिक उपायांवरच भर द्या.