Manasvi Choudhary
आज बुधवार विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.
विमान अपघाताची नेमकी कारणे काय आहेत? विमान कधी नेमका पेट घेतो? याविषयीची माहिती जाणून घ्या
विमानाच्या अपघाताचं महत्वाचं कारण म्हणजे तांत्रिक बिघाड. जेव्हा विमानाच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड होतो. विमानाच्या नॅव्हिगेशन सिस्टिममध्ये गडबड होते तेव्हा लँडिंग गिअरमध्ये समस्या निर्माण होतात अशा समस्येत विमानावरचं नियंत्रण सुटते आणि विमान खाली कोसळते.
विमानाचे इंधन हे ज्वलनशील असते. अपघाताच्या वेळी किंवा विमानाची धडक बसल्यास इंधन टाकी फुटून गळती सुरू होते. हे इंधन इंजिनाच्या गरम भागाच्या किंवा घर्षणामुळे निर्माण झालेल्या ठिणगीच्या संपर्कात आले की आगीचा मोठा भडका उडू शकतो
लँडिंगच्या वेळी जर इंजिनवर ताण आला किंवा पक्षी धडकल्याने इंजिन निकामी झाले, तरीही आग लागण्याची शक्यता असते.
विमानात तारांचे प्रचंड मोठे जाळे असते. या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यास किंवा बॅटरीमध्ये बिघाड झाल्यास विमानाच्या आतून किंवा बाहेरून आग लागते.