Bharat Jadhav
शेती करण्यासाठी तसेच गुंतवणूक म्हणून शेतजमीन विकत घेण्याचा जर तुमचा प्लॅन आहे. राज्यातील जमीन खरेदी संबंधित वेगवेगळे नियम अस्तित्वात आहेत.
महाराष्ट्रात सिलिंग कायदा (Ceiling Act) अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार आपल्या राज्यात एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त किती जमीन असावी? याबद्दल नियम सांगितले गेले आहे.
या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर मर्यादेपेक्षा जास्त जमीन असेल तर सरकार ती संपादित करून इतर व्यक्तींना वाटप करण्याची तरतूद आहे.
बागायती शेती असल्यास एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 18 एकर जमीन खरेदी करता येते.
हंगामी बागायती असेल तर अशावेळी एक शेतकरी जास्तीत जास्त 36 एकर जमीन खरेदी करू शकतो.
जेथे 12 महिने पाणीपुरवठा नाही, पण एका पिकासाठी पाणीसाठा आहे, अशा ठिकाणी जास्तीत जास्त 27 एकर जमीन खरेदी करता येते.
जर जमीन कोरडवाहू असेल तर एक शेतकरी जास्तीत जास्त 54 एकर एवढी जमीन खरेदी करू शकतो.