Surabhi Jayashree Jagdish
टायर हा कोणत्याही कार किंवा बाइकचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. रस्त्याशी वाहनाचा थेट संपर्क टायरच्या माध्यमातूनच होतो. त्यामुळे टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा असणं वाहनाची हे मायलेज, ड्रायव्हिंग कंट्रोल आणि टायरचं आयुष्य यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
साधारणपणे दर १५ दिवसांनी किमान एकदा टायरमधील हवेचा दाब तपासावा. नियमित तपासणी केल्यामुळे टायरमध्ये हवा कमी किंवा जास्त असल्याचे वेळेत लक्षात येतं. त्यामुळे वाहन गाडी किंवा बाईक चालवताना टायरची कार्यक्षमता आणि नियंत्रण योग्य राखण्यास मदत होते.
तुमच्या वाहनाचा दररोज वापर होत असेल तर टायरमधील हवेच्या दाबाकडे नियमित लक्ष देणं गरजेचं आहे. दररोजच्या वापरामुळे टायर सतत रस्त्याच्या संपर्कात असतात आणि त्यातील हवा हळूहळू कमी होऊ शकते. त्यामुळे अशा वाहनांमध्ये दर १५ दिवसांनी टायरची हवा तपासणं अधिक महत्त्वाचं आहे.
टायरमधील हवा वारंवार कमी होत असेल तर ही बाब दुर्लक्षित करू नये. अशावेळी टायर आणि त्याच्या व्हॉल्व्हची तपासणी करून घ्यावी. गरजेनुसार टायरमध्ये वाहनासाठी निर्धारित प्रमाणात हवा भरून घेऊन हवा कमी होण्याचं कारण तपासावं.
लांब प्रवासाला निघण्यापूर्वी सर्व टायरमधील हवेचा दाब तपासणं आवश्यक आहे. फक्त पुढच्या टायरचीच नाही तर मागील टायर आणि स्पेअर टायरचीही तपासणी करावी. यामुळे प्रवासादरम्यान टायरमध्ये हवा कमी असल्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी टाळण्यास मदत होते.
हवामानात बदल झाल्यानंतर टायरमधील हवेचा दाब तपासणे फायदेशीर ठरते. तापमानातील बदलामुळे टायरच्या आतील हवेच्या दाबावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तापमानात मोठा बदल झाल्यानंतर टायरमधील हवा तपासून ती वाहनासाठी निर्धारित पातळीवर ठेवावी.
टायरमधील हवेचा दाब दर १५ दिवसांनी तपासणं गरजेचं आहे. मात्र रोज वाहन वापरणाऱ्या व्यक्तींनी गरज भासल्यास त्यापेक्षा लवकरही हवा तपासावी. नियमित तपासणीसोबत लांब प्रवासापूर्वी आणि हवामान बदलल्यानंतर टायरची हवा आवर्जून तपासावी.