ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शास्त्रानुसार, स्वच्छ अंघोळ केल्यामुळे तुमच्या ग्रहांची स्थिती सुधारू शकते.
सकाळी उठल्यावर अंघोळ करुण घरातील देवाची पूजा करावी यामुळे घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते.
मात्र या गोष्टी अंघोळीच्या पाण्यात मिसळ्यास तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.
अंघोळीच्या पाण्यात वेलची किंवा केशर टाकल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते आणि देवी लक्ष्मीची कृपा रहाते ज्यामुळे धनलाभ होतो असे मानले जाते.
अंघोळीच्या पाण्यात दूध मिसळल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि धनलाभ होऊ शकतो.
अंघोळीच्या पाण्यात १-२ थेंब गाईचे तूप टाकल्यामुळे शरीर निरोगी व सुंदर रहाते आणि कुंडलीतील मंगळाची स्थिती मजबूत होते ज्यामुळे पैशांची टंचाई येत नाही असे मानले जाते.
अंघोळीच्या पाण्यात साखर घातल्यास तुमच्या आयुष्यात गोडवा वाढेल आणि तुमच्या कुंडलीतील गुरू आणि चंद्राची स्थिती सुधारण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.