Shreya Maskar
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त आणि आम्लाचे प्रमाण कमी असते, त्यामुळे काकडी पोटाला थंडावा देते. छातीत होणारी जळजळ कमी करते.
ब्रोकोलीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. फायबर तुमच्या पचनसंस्थेतील अतिरिक्त आम्ल शोषून घेते आणि पोटदुखी, गॅसची समस्या कमी करते.
हिरव्या शेंगा अल्कधर्मी असतात. त्या पचायला हलक्या असतात. हिरव्या शेंगा कमी चरबीयुक्त आणि कमी आम्लयुक्त भाजी आहे. तसेच ती बाजारात सहज उपलब्ध असते.
गाजर, बीट आणि रताळे हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत जे पोटातील ॲसिडीटी कमी करण्यास मदत करतात. तसेच यामुळे पचनक्रिया देखील सुरळीत होते.
पालेभाज्या अल्कधर्मी असतात. या नैसर्गिकरित्या कमी साखरयुक्त असतात. ज्यामुळे त्या पोटातील तीव्र आम्लाचा प्रभाव कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. तसेच पालेभाज्यांमध्ये चरबीचे प्रमाण कमी असते.
फ्लॉवर भाजी अल्कलाईन या गुणधर्माने समुद्ध असते. ही भाजी ॲसिड रिफ्लक्सचा त्रास निर्माण करत नाही. कोबी पचायला हलकी असते. कोबी कच्ची खाल्ली तरी आरोग्यास फायदेशीर ठरते.
आम्लपित्त नियंत्रित करण्यासाठी आणि ते टाळण्यासाठी भोपळा अत्यंत फायदेशीर आहे. ही एक कमी आम्लधर्मी भाजी असून पचनक्रिया सुरळीत करते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.