Shreya Maskar
पावसाळा म्हटले की आपण वारंवार चहा पितो, ज्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो. मात्र जास्त चहा प्यायल्याने फक्त ॲसिडीटी नाही तर आरोग्याला इतर धोकादायक समस्या उद्भवतात.
चहामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे टॅनिन तुमच्या पचनसंस्थेच्या अस्तराला त्रास देऊ शकतात. पावसाळ्यात जड, तळलेल्या पदार्थांसोबत चहा प्यायल्याने तीव्र पोटफुगी, गॅस आणि अपचन होऊ शकते.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने टॅनिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे तुम्हाला मळमळ किंवा चक्कर येऊ शकते. कॅफीनमुळे वारंवार डोकेदुखी, थकवा किंवा चिडचिड वाढते.
दिवसभरात अनेक कप चहामधून मोठ्या प्रमाणात कॅफीनचे सेवन केल्यास तुम्हाला उत्साही वाटते पण यामुळे चिंता, अस्वस्थता किंवा हृदयाची गती वाढू शकते.
चहामध्ये कॅफीन असते, जे मज्जासंस्थेला उत्तेजित करते. त्याचे अतिरिक्त सेवन केल्यास मेलाटोनिनच्या पातळीत अडथळे येतात आणि झोपेच्या समस्या (निद्रानाश) होऊ शकतो.
पावसाळ्यातील दमटपणामुळे तुमचे शरीर तहानकडे दुर्लक्ष करू शकते. कॅफीनयुक्त चहा जास्त प्यायल्याने वारंवार लघवी होते. ज्यामुळे डिहायड्रेशन होते.
चहामधील टॅनिनमुळे शरीरात लोहाची कमतरता भासते. यामुळे ॲनिमियाचा त्रास उद्भवतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.