Shreya Maskar
द्राक्षांमध्ये ऑक्सलेट्स (Oxalates) असतात, जे शरीराच्या चयापचय क्रियेवर परिणाम करतात, तुमच्या पोटाच्या पीएचवर परिणाम करतात आणि आम्लपित्त वाढवतात.
अननसामधील सायट्रिक ॲसिडमुळे पोटाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. अननस खाल्ल्याने पोटातील ॲसिडची पातळी वाढते आणि गॅसची समस्या उद्भवते.
संत्र्यांमध्येही सायट्रिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे छातीत जळजळ होते आणि पोट दुखी वाढते. तुम्हाला पोटाचे विकार असल्यास संत्र्यांचे सेवन मर्यादित करा.
लिंबूचे सेवन मर्यादित करावे, कारण यात सायट्रिक ॲसिड असते, जे ॲसिडीटीला कारणीभूत ठरते. रिकाम्या पोटी लिंबू सरबत प्यायलात तर पोटातील ॲसिडीचे प्रमाण वाढते.
कच्चा पेरू खाल्ल्याने पचनक्रियेत अडथळा येतो. बियांसहित पेरू खाल्ल्याने पोट फुगू शकते. संवेदनशील पोट असणाऱ्या व्यक्तींनी किंवा गॅस्ट्रायटिसचा त्रास लोकांनी कच्चा पेरू खाणे टाळा.
डाळिंब गोड-आंबट असते. यामध्ये सायट्रिक ॲसिड आणि टॅनिक ॲसिडसारखे घटक असतात, ज्यामुळे पोटात गॅस्ट्रिक ॲसिड वाढू शकते.
ॲसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांनी लिंबूवर्गीय नसलेल्या आणि कमी आम्लयुक्त फळांचा आहारात समावेश करावा. ज्यामध्ये जास्त पाणी आणि फायबर आहे, अशी फळे खावी. उदा. सफरचंद , केळ
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.