ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गरुड पुराण हे हिंदू धर्मातील प्रमुख ग्रंथांपैकी एक आहे.
गरुड पुराणात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्वर्गातून नरकात जाण्याच्या गोष्टींची माहिती दिली आहे.
गरुड पुराणानुसार, माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. याद्वारे त्याला स्वर्ग आणि नरकात नेण्यात येतं.
जे वाईट कृत्ये करतात त्यांना नरकात खूप कठोर शिक्षा दिली जाते. गरूड पुराणानुसार कोणाला नरकात पाठवलं जातं ते पाहूयात
जे निष्पाप लोकांना त्रास देतात त्यांना नरकात यातना भोगाव्या लागतात.
गरुड पुराणानुसार, जे लोक दुसऱ्या स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवतात त्यांनाही नरकात स्थान मिळते.
जे घरात किंवा बाहेर वडीलधाऱ्यांचा अपमान करतात त्यांना नरकात अग्नीत जाळले जाते.